प्रॉब्लेम्स

              मी अशीच शनिवारी लक्ष्मी रोड वर फिरत होते .. फिरत असताना एक छोटीशी पाटी दिसली. जीवनात त्रासलेले आहातआयुष्यात सुखी होण्याचे 101 उपाय ! संपर्क साधा "सुखिआयुष्य संस्थालक्ष्मी रॊडपुणे" .मी बघतच राहिले ... अरे आपले आयुष्य आहेदुसरा माणूस आपल्याला काय मदत करणारआणि महत्वाचे म्हणजे याची वेळच का यावी ?? खरं म्हणजे माणसाने नेहमी समाधानी आणि खुश राहायला हवे .. पण हे पुस्तकातले वाक्य झाले.. वास्तविक पाहता माणूस नुसता सुखाच्या मागे पळत असतो. आणि दुःखाचे आभाळ कोसळल्यासारखा वागत असतो.. आणि मलाच किती प्रॉब्लेम्स दिले आहेत देवाने असे कोचत बसलेला असतो..अर्थात याला माझाही अपवाद नाही..
             काही महिन्यांपूर्वीची  गोष्ट आहेमाझ्या आधीच्या कंपनी मधील एक सहकर्मचारी होता राहुलतो सारखा अमेरिका पाठवा अमेरिका पाठवा म्हणून  मॅनेजर समोर रडायचा.अर्थात त्याची तशी चूक नव्हती. सॉफ्टवेअर कंपनी मध्ये असाल तर परदेशी जाणे गरजेचे असते. तुमच्यासाठी नाही तर आजूबाजूंच्यांसाठी !! कारण तुम्हाला कंपनीमध्ये २ वर्ष पूर्ण झाली कि ,मग दूरचा मामा ,आतेभाऊ विचारतात मग काय कधी पाठवणर तुला अमेरिकेला ? असो त्या राहुलला मॅनेजर ने एकदाचे अमेरिका पाठवले आणि ते पण  चक्क ६ महिन्यांसाठी !! त्याला तिथे जाऊन २ महिने झाले न झाले तोच त्याचा मला मेसेज आला कि मला इथे फार बोर होत आहे  एकट्यालापरत तिकडे यावे वाटत आहे .. अरे मी म्हणलं आधी पाठवत नव्हते म्हणून रडायचा आणि आता तिथे बोर होतेय म्हणून रडतोय .. असे वाटले कि त्याला म्हणावे अरे हा खूप शुल्लक प्रॉब्लेम आहे .. बाहेर जरा डोळसपणे बघ म्हणजे कळेल कि किती आणि कसे प्रॉब्लेम्स असतात लोकांना..
            आम्ही इंजिनीरिंग मध्ये असल्याची गोष्ट आहे.. आम्ही एका क्लब तर्फे मुक बधिर शाळेला भेट दिली होती.त्यांच्यासाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते.. आम्हाला पाहून मुलं खूप खुश दिसत होती.. एवढ्या लहान लहान मुलांनी इतकी सुंदर आणि  मनमोहक चित्र काढली हे बघून आम्ही आश्चर्यचकित झालो.. देवाने जरी त्यांना ऐकायची आणि  बोलायची क्षमता दिली नसलीतरी हातामध्ये सुंदर कला दिली आहे  ...आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ती मुलं त्यांच्याकडे नसलेल्या गोष्टींवर रडण्यापेक्षा असलेल्या गोष्टींचा पुरेपूर आनंद घेत होते.. त्यांच्याकडे बघून आपल्याकडे खूप काही आहे आणि तरी आपण रडत असतो याची जाणीव मला झाली ..आणि ती छोटीशी चिमुरडी पोरं आयुष्याचा धडा शिकवून गेली..

गोट्या, विटी दांडू आणि बरेच काही..


                  ११ ची वेळ झाली होती.. आमच्या कॉफी ब्रेक ची वेळ.. आम्ही हि वेळ कधीच चुकवत नाही. मग कितीही कामं असूदेत.. कारण रोजच्या कामाच्या गडबडीत, हिच  वेळ आम्हाला रखरखीत उन्हातल्या मंद वाऱ्याच्या झुळुकेप्रमाणे वाटते. आमची कॉफी बरोबर, क्रिकेट वर चर्चा चालू होती.. नुकतीच भारताने श्रीलंके विरुद्ध मॅच हारली होती ..कोण कसे खेळले.. कोणी कश्या चुका केल्या.. इंडियन प्रीमियर लीग मध्ये चांगली कामगिरी केलेल्या गोलंदाजांनी देखील कशी माती खाल्ली यांवर.. असाच संवाद सुरु असताना , एकजण मधेच म्हणाला , कि मी थोड्या वर्षांनी हि नोकरी सोडून गोट्या लीग काढणार!! जसे क्रिकेट, फुटबॉल,कब्बडी यांचे आहे ना  तसे.. आम्हाला थोड्यावेळ कळलेच नाही कि तो काय म्हणत आहे ते .. नंतर कळल्यावर मात्र हसू आवरता आले नाही . गोट्या लीग म्हणे!!!
                 या काळात कसल्या आल्यात  गोट्या .. गोट्या, विटी दांडू, लगोरी यासारखे खेळ आता नामशेष होत चालले आहेत.. आता मुलांना हातात मोबाईल हवा.. मग तो गावात राहणार असुदेत  कि शहरात राहणारा.. आणि  विशेष म्हणजे नुसते मोबाईल असून चालत नाही तर इंटरनेट पण हवे.. ऐकून आश्चर्य वाटले ना? मला पण असेच झाले होते.. मी माझ्या बहिणीच्या घरी राहायला गेले होते. तिला एक पाच वर्षांची मुलगी आहे . ती काही केल्या जेवायला तयार होत नव्हती. मग माझी ताई तिला जरा दरडावतच म्हणाली "जेव चुपचाप नाहीतर wi-fi बंद करेन" हे ऐकल्यानंतर मात्र तिने क्षणाचाही विलंब न लावता जेवायला सुरवात केली.. मी तर अचंबित होऊन बघतच राहिले!!
     wi-fi बंद करण्याची  धमकी!!! आमच्या वेळी तर, पोलीस मामांना बोलावेन, बाबा  रागावतील.. अश्या स्वरूपात धमकया असायच्या. आता मोबाईल, इंटरनेट, संगणक यांच्यासमोर कशाशीच बिशाद चालत नाही. मग असे वाटते कि या गोष्टी तर माणसाने स्वतःच्या सोयीसाठी निर्माण केल्या आहेत .. तर  याच्या आहारी जाणे कितपत योग्य आहेआणि लहानपणापासूनच जर मुलं मोबाईल मध्ये एवढी गुरफटून गेली  तर त्यांना बाहेरची दुनियादारी कधी आणि कशी कळणार? अशीच मुलं मग चार चौघांमध्ये जायला घाबरतात आणि कावरी बावरी होताना दिसतात. आता मुलांना असेच एक्कलकोंडे बनवायचे कि गरुडाच्या पिल्लासारखे धीट बनवायचे ते तुम्हीच ठरवा!!!

        मी माझे आवरून  नेहमीप्रमाणे ऑफिस ला जायला निघाले ,आज बऱ्याच दिवसांनी आकाशात  काळे ढग दाटून आले होते.. ते  काळे ढग पावसाळा जवळ आल्याची जणू आठवणच  करून देत होते .मग माझ्या लक्षात आले कि अरे  आज तर  जून ...म्हणजे पावसाची हजेरी हि  नक्की  .. आणि तिथूनच मनामध्ये विचारांची कालवाकालव सुरु झाली ...  एकामागून एक पुस्तकाची पाने जशी उलटून पहिल्या पानावर जावी तशी..
       अजून शाळेचा पहिला दिवस आठवतो.. उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्या कि जून च्या पहिल्या आठवड्यात शाळा सुरु   व्हायची . आणि त्याबरोबर मान्सून चे पण आगमन व्हायचे . शाळा सुरु होण्याआधी बाबा आम्हाला गावात घेऊन जायचेनवीन युनिफॉर्म .. नवीन दप्तर ... रेनकोट.. वह्या पुस्तक आणायला ... तेव्हा नवीन दप्तर आणि नवीन रेनकोट ची मजा   वेगळी असायची.. वह्या पुस्तकांमधून येणार सुगंध तर मन मोहून टाकायचा .. आणि कधी एकदा त्या करकरीत   वह्यांवर नवीन पेनाने नाव टाकते असे व्हायचे .. त्याकाळी शाई च्या पेन ची फॅशन होती.. आमच्या शिक्षिका तर शाईच्या पेनाचाच आग्रह धरायच्या.. त्यांच्या मते शाईच्या पेनाने ने अक्षर सुधारते .. माझे अक्षर तर प्रत्येक वर्षी बदलायचे.. मग तो कोणताही पेन का असेना..
         पावसातून घरी भिजून आले  कि आईबरोबर वाफाळलेला चहा घेत गप्पा मारण्यात स्वर्गप्राप्ती झाल्याचा  आनंद मिळे..चहाबरोबर कधी कधी तिखट मिठाचे पोहे तर कधी पातळ पोह्याचा चिवडा.. आणि बाबांच्या मनात आली कि   गरमा गरम कांदा भजी हे ठरलेले.. ओले केस घेऊन खिडकीतून त्या पावसाच्या सरीकडे एकसारखे बघत राहायचे.. आणि साथी  ला आकाशवाणी वर किशोर कुमारमहम्मद रफी यांची गाणी ऐकायची  ....
         रात्र झाली कि पावसाचा जोर आणखीनच वाढायचा.. जोराचे वादळ.. विजांचा कडकडाट.. ढगांचा गडगडाट ..  आणि त्यात MSEB  च्या कृपेने लाईट्स जायचे..आणि सगळीकडे काळोख व्हायचा . मग बाबा मला आणि माझ्या   भावाला घेऊन बालकनीमध्ये बसायचे.. मग आम्ही गावांच्या भेंड्या खेळायचो..आणि सगळ्या गावांची नावे घेऊन   संपली कि मग बाबा आम्हाला भूतप्रेतांच्या  गोष्टी सांगायचे .... लाईट्स येईपर्यंत आमचे हेच चालायचे..
       किती बेफिकीर राहायचो तेव्हा आम्ही !!!!.एवढ्या लहान वयात सुद्धा!! भीतीचा थोडा देखील लवलेश नव्हता..मग ते भूत असो कि जोरदार पाऊस.. कि काळोख .. आई बाबांच्या छत्रा खाली सगळेच आल्हाददायी  वाटायचे ..या   आठवणीने टचकन डोळ्यात पाणी आले .. आणि ते पाणी टिपेपर्यंत ऑफिस पर्यंत कसे पोहचले ते कळलेच नाही..