अति परिचयात अवज्ञा सन्तत गमनात अनादरः भवति !
मलये भिल्ली पुरन्ध्री चन्दन तरुन इन्धनम् कुरुते !
मलये भिल्ली पुरन्ध्री चन्दन तरुन इन्धनम् कुरुते !
खरंच हे सगळ्या नात्यांसाठी लागू पडते.. ते नवरा बायको असूदेत.. कि दोन मित्र असूदेत.. नाहीतर कोणीही.. प्रत्येक नात्यामध्ये एक सीमा असते .. तिचे जर उल्लंघन झाले तर मग त्या व्यक्तीची कालांतराने चीड यायला लागते.. माझे ओळखीच्यातलेच उदाहरण बघा न.. माझा चांगला मित्र आदित्य ... तो खूप जास्त social आहे.. त्याचे आहेत ढीगभर फ्रेंड्स.. आणि मग त्याचे कसे असते कि एकदा मित्र झाला कि मग त्याचे पर्सनल प्रॉब्लेम पण ह्याचेच !!! असेच त्याचा एक चांगला मित्र झाला रवी .. आणि तो पुण्यामध्ये याच्या सांगण्यावरून आला.. आदित्यने त्याला प्रत्येक कामामध्ये मदत केली..तो शहरात नवीन म्हणून घरातली भांडी, सामान सगळं त्याला मदत म्हणून देऊ केले.. एवढ्यावर थांबले असते तर ठीक होते पण रवीचे वैवाहिक जीवनातले प्रॉब्लेम्स वेगळे.. त्यात पण तो आदित्यालाच इन्व्हॉल्व्ह करू लागला.. आणि मग रोज नवीन प्रॉब्लेम्स . सुरवातीला हा माझा मित्र पण त्याला मदत करत असे ..पण नंतर याचे स्वतःचे आयुष्य negative झाल्यासारखे वाटू लागले.. आणि याला रवीची चीड येऊ लागली पण काही पर्याय नव्हता !! खर तर मित्र हे सुखदुःख वाटण्यासाठीच असतात पण याचा अर्थ असा नाही कि तुम्ही दुसऱ्यांच्या प्रॉब्लेम्स मध्ये एव्हढे इन्व्हॉल्व्ह होता कि दुसरी व्यक्ती तुमच्या वर परावलंबी होते आणि नंतर त्याची बांडगुळ होतात.. आणि त्या बांडगुळाला नंतर दूर करणे पण शक्य होत नाही आणि पोसणे पण अवघड जाते..
मी म्हणते अशी परिस्थिती कधी आलीच नसती जर तुम्ही थोडी space दिली असती एकमेकांना .. मी काय माणूस घाणी नाहीये किंवा एक्कल कोंडी नाहीये .. पण healthy relation साठी थोडी sapce हवीच .. बरेच लग्न झालेले couples असतात ते म्हणतात न कि लग्नाआधी आमच्या relationship मध्ये जो स्पार्क होता न तो नाही राहिला आता.. अरे कसा राहणार जर तुम्ही २४ तास एकमेकांच्या डोक्याला डोकी लावून बसलात तर .. जरा एकमेकां sapce देऊन बघा न . प्रत्येकाला आपले आयुष्य असतेच.. आणि जर तुम्ही चांगले मित्र असाल तर फक्त त्याला मार्ग दाखवायला हवा बाकी त्याच्यावर सोपवायला हवे.. . जेव्हा माणूस स्वतः सुखी असतो न तेव्हाच तो relationship किंवा ग्रुप मध्ये सुखी राहू शकतो....