लग्न - दोघांचा निर्णय

                  परवा दम लागागे हैशा मूवी बघितला.. त्यामधील आयुष्यमान आणि भूमी ची भूमिका वाखाणण्याजोगी आहे..त्या मूवी चा विषय हा  रोजचाच आहे पण हलकाफुलका आहे .. मुलाचे त्याच्या मनाविरुद्ध लग्न होते एका लठ्ठ मुलीशी . आधी तो तिला बरोबर घेऊन जायला पण लाजायचा... पण हळूहळू त्याला ती कशी आवडायला लागते याचे मस्त आणि सध्या स्वरूपात वर्णन केले आहे..  असे बरेच मुलं मुली असतात ज्यांचे त्यांच्या मनाविरुद्ध लग्न होते. काही लोक या मूवी प्रमाणे चांगल्याने निभावतात आणि काही आयुष्यभर रडत राहतात... यात घरचे पण तेवढेच दोषी! कारण दोघांपैकी एक जरी खुश नसेल तरी दुसऱ्याचे आयुष्य वाया..  लग्न हा मोठा निर्णय असतो खरा.. त्यामध्ये मुलामुलींवर कोणतीही जबरदस्ती करून चालत नाही कारण त्या दोघांनाच पुढे सोबत राहायचे असते,, जर  ती मुलगा किंवा मुलगी स्वतःच्या बायको ला किंवा नवऱ्याला सगळ्या लोकांसमोर घेऊन जायला तयार नसतील किंवा त्यांना त्याची लाज वाटत असेल तर त्यांनी लग्न करूच नये कारण जर तुम्हीच तुमच्या नवरा किंवा बायको ला रिस्पेक्ट दिला नाही तर बाकीचे तरी कसे देतील..
              आणि काही महाभाग असे असतात कि  ज्यांच्यावर कोणतेहि  बंधन नसते लग्नाबाबत ..पण त्यांना स्वतःचा निर्णय स्वतः घेता येत नाही.. आणि मग ते स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतात आणि मग माझे जबरदस्ती लग्न केले म्हणून घरच्यांना दूषणे देतात.. आधी १०० मुली नाकारायच्या कारण प्रत्येकीमध्ये काही न काहीतरी कमी.. कोण बुटकी आहे कोण सावळी आहे कोण कमी शिकलेली .. वगैरे वगैरे.. मग शेवटी वय वाढायला लागले कि कोणत्याही मुलीला हो म्हणायचे.. आणि मग स्वतःच्याच लग्नात आभाळ कोसळल्यागत चेहरा पडून बसायचे.. म्हणजे सगळे लोक म्हणतात कि बिचाऱ्याचे कसे झाले न.. तो किती भारी दिसतो त्या मानाने मुलगी तशी डावरी च आहे.. पण हा निर्णय त्याचा स्वतःचा होता न.. त्याच्यावर कोणाचे बंधन नव्हते.. मग ?? ८-९ महिन्यांच्या कोर्टशिप नंतर तुम्ही लग्न करता म्हणजे तुम्ही एकमेकांना चांगल्याने ओळखता.. आणि सुरवातीला म्हणतात कि मला लूक्स मॅटर करत नाहीत.. आणि मग लग्नानंतर तुम्ही तुमच्या बायकोशी कोणाला इंट्रोड्युस करत नाहीत का तर तुम्हाला लाज वाटते?? अरे मग तुम्ही लग्न केलेच का??  लग्न ठरून ६-७ महिने झाल्यानंतर तुम्हला कळायला लागते कि हि मुलगी मला आवडत नाही मग इतके दिवस झोप काढत होतात का?? अरे तिचा विचार करा न.. पसंत करायच्या आधीच नकार दिला असता तर हे प्रकरण एवढे वाढलेच नसते.. त्यात त्या मुलीचेच किती नुकसान.. म्हणून जोपर्यन्त तुम्हाला १०० टक्के वाटत नाही कि हाच मुलगा किंवा हीच मुलगी जिच्याशी मला लग्न करायचेय त्याशिवाय करूच नाही..  नाहीतर मग कोणाशीही झाले तरी निभावून नेता आले पाहिजे.. डिवोर्स !! नुसता मूवी मध्ये किंवा सिरिअल्स मध्ये बघायला सोप्पे वाटते पण प्रत्यक्षात ते खूप भयानक असते.. आणि मला मुलगी आवडत नाही किंवा मुलगा आवडत नाही हे काही डिवोर्स मागचा कारण असू शकत नाही..