काही सुचलं नाही म्हणून ...

आज निवांत वेळ होता  सोबतीला  माझी  आवडती डायरी होती पण लिहण्यासाठी काही टॉपिक सापडत नव्हता .. आज नवीन ऑफिस चा पहिला दिवस असल्याने  कामाचा विशेष लोड हि नव्हता ..  मागच्या आठवड्यातच मी माझ्या आधीच्या कंपनीचा निरोप घेतला..  कंपनी सोडताना मनावर एक विशिष्ट प्रकारचे  दडपण आले होते. येणारच न !!!. कारण त्या कंपनीमध्ये मी २.५ वर्ष होते. तिथे इतके चांगले फ्रेंड्स झाले होते.. ग्रुप्स झाले होते..  कि मी ती कंपनी सोडताना काय  कमवले असे मला विचारले तर मी ना कचरता म्हणेन कि मी माणसं कमावली  आणि तेच तर महत्वाचे असते . माणूस हा एक social animal आहे.  तो एकटा राहूच शकत नाही.. आणि आपल्या आयुष्यामध्ये मला तर वाटते कि माणसाचं महत्वाची असतात.. अशाप्रकारच्या विचारांनी माझे मन बेचैन होत होते.. कारण आता परत श्री गणेशाय नमः.. नवीन टीम कशी असेल? मी त्यांच्यात अड्जस्ट करू शकेल का? वगैरे वगैरे .. कामाच्या स्वरूपाचे काही वाटत नाही.. काम माणूस अड्जस्ट करून घेतो.. पण आजूबाजूचे लोक चांगले हवेत.. पण आज माझ्या असे लक्षात आले कि  इथे. चेहरे नवे होते.. qualities वेगळ्या होत्या.. कामाचे स्वरूप वेगळे होते पण माणसं तीच होती.. गरजा त्याच होत्या.. जगण्याची पद्धत वेगळी असली तरी भावना त्याच होत्या.. हे बघितल्यावर मला असे जाणवले कि अरे जगाच्या कुठल्याही ठिकाणी जाऊ तरी आपल्याला हेच बघायला मिळेल.. फक्त त्यांच्याबरोबर जुळवून घ्यायची कला आपल्याला अवगत हवी!!!