सकाळीच फोन ची घंटी वाजली .. इतक्या सकाळी कोणी फोन केला या विचारातच फोन उचलला.. तिकडून आवाज आला.. ताई डिलिव्हरी झाली ..आमची कामवाली बाई होती.. तिच्या मुलीच्या डिलिव्हरी साठी सुट्टीवर गेलेली.. जरा त्रस्तच वाटत होती.. आवाजात आनंद नव्हता.. म्हणत होती ताई पोरीने खूप त्रास दिला.. रात्रभर जगवले..आता कुठे डिलिव्हरी झाली.. आणि हळू आवाजात म्हणली कि मुलगी झाली बघा.. काई करावे आता?? तिच्या आवाजातली शांतता बघून मन खायला उठले.. मुलीला मुलगी झाली म्हणून अजिबात खुश नव्हती ती....
आज तर मुली आणि मुलांमध्ये काही फरक राहिला नाही.. आणि हि परिस्थिती कामवालीकडे पण आहे.. ती तिच्या नवरायांपेक्षा जास्त कमावते .. पण तरीदेखील हिने असा विचार करावा हे अपेक्षित नव्हते. पण ती देखील काय करणार बिचारी तिच्या दुसऱ्या मुलीचा सासरी होणारा छळ बघून तिला वाटले असेल कि कशाला त्या नवीन जन्मलेल्या जीवाला त्रास !!! पुढे जाऊन तिच्या नशिबी हेच येणार नाही हे कशावरून ...
अशातच मला दुसरी एक घटना आठवली .. माझ्या ऑफिस मधील मैत्रीण.. मुंबई उपनगरात राहणारी.. लोकल च्या दगदगीच्या आणि धावपळीच्या दुनियेत वावरणारी.. तिच्या शेजारी एक कुटुंब राहायचे.. त्या कुटुंबातील महिला शिकलेली आणि स्वतःच्या पायावर उभी असणारी.. रोज लोकल मधून प्रवास करणारी.. पण तिच्या नशिबी काही वेगळच होता.. तिला पहिल्या दोन्ही मुलीच म्हणून सासरच्यांकडून आणि नवऱ्याकडून रोज टोमणे आणि छळ सहन करावे लागत असे.. असच असताना तिला परत दिवस गेले.. आणि घरच्यांच्या आग्रहाखातीर तिने गर्भलिंग तपासणी देखील केली.. त्यामध्ये असे कळले कि तिला मुलगा होणार आहे.. त्यामुळे घरचे खूप खुशीत होते.. तिचे दिवस भरत आले होते.. एकदा अशीच ती ऑफिस मध्ये जाण्यासाठी लोकल मधून प्रवास करत होती.. आणि अचानक एकाच धक्का लागून ती चालत्या गाडीतून खाली पडली.. पण सुदैवाने किंवा दुर्दैवाने म्हणा तिला जवळच्या हॉस्पिटल मध्ये भरती केले.. तिची हालत खूप बिकट होती.. अशातच डॉक्टरांनी तिची तपासणी केली आणि सांगितले कि आई किंवा बाळ यापैकी फक्त एकालाच आम्ही वाचवू शकतो.. आता या कुटुंबासमोर प्रश्न मोठा होता आई का बाळ (मुलगा) पण उत्तर अगदी सहज आणि सोप्पं होता.. आई .. पण एका क्षणाचाही विलंब न लावता तिचा नवरा म्हणला कि बाळाला वाचवा.. आम्हाला वंशाला दिवा हवा आहे.. हिला वाचवून आम्ही काय करू.. डॉक्टर देखील २ मिनिटे स्तब्ध झाले.. हृदय थांबल्यासारखे वाटू लागले.. . पण अर्थातच कुटुंबाने सांगिलटल्यामुळे डॉक्टरांनी मुलाला वाचवले.. त्या मुलाला जन्मतःच पोरका केला.. वंशाला दिवा मिळावा म्हणून आई चा बळी .. हे स्वप्नात देखील कोणी विचार करेल असे वाटले नव्हते. स्त्री म्हणजे काय machine आहे का मुलांना जन्म द्यायची?? मग विचार येतो कि स्त्री खरच स्वतंत्र झालीय का?? वेशभूषा बदलली.. बाहेर कमला जाऊ लागली.. पैसे कमवू लागली.. पण खरंच तिला स्वतःच काही अस्तित्व आहे का ? का तिने नेहमीच दुसऱ्यांसाठी जगायचं??
Well said #touching 👏
ReplyDeleteThanks
Deleteअजून ही असे विचार लोक करत असतील तर अवघड आहे...
ReplyDeleteHo na..
DeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteExtremely nice Marathi blogs for Marathi readers!
ReplyDelete